शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सेना, राणेंशी मुख्यमंत्र्यांचा डबल गेम : जयंत पाटील-शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरी राष्ट्रवादी भाजपला पाठिंबा देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 00:33 IST

इस्लामपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकीकडे नारायण राणे यांना मंत्रिमंडळात घेणार म्हणतात, तर दुसरीकडे शिवसेनेला चुचकारताना त्यांना घेणार नाही

ठळक मुद्देराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील सत्ता स्थापनेवेळीसाडेतीन वर्षात भाजप-सेनेमध्ये विश्वासाचे वातावरण

इस्लामपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकीकडे नारायण राणे यांना मंत्रिमंडळात घेणार म्हणतात, तर दुसरीकडे शिवसेनेला चुचकारताना त्यांना घेणार नाही म्हणून सांगतात. या डबल गेममुळे सरकारची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. राणेंचा मंत्रिमंडळ प्रवेश शिवसेनेने मान्य केला, तर त्यांचे घोंगडे कोठेतरी अडकले आहे, हे सिध्द होईल.

तथापि राणेंच्या प्रवेशाने शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढला, तर राष्ट्रवादी भाजपला पाठिंबा देणार नाही, अशी माहिती राष्ट्रवादीचे गटनेते, आमदार जयंत पाटील यांनी बुधवारी दिली.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशन संपवून आल्यानंतर आमदार पाटील यांनी येथे पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, हल्लाबोल यात्रेमुळे सरकारवर दबाव निर्माण करून शेतकºयांची कर्जमाफी, वाया गेलेल्या शेतीमालाला नुकसानभरपाई असे निर्णय सरकारला घ्यायला भाग पाडले. शेतकरी आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शेतकºयांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरल्यामुळे सरकारला त्याची नोंद घ्यावी लागली. अधिवेशनात अनेकविध प्रश्नांवर सरकारला धारेवर धरले. उत्तर देण्याऐवजी मंत्र्यांनी चलाखीने या प्रश्नांना बगल दिली.

ते म्हणाले की, शेतकºयांच्या कर्जमाफीचे पैसे ३१ मार्चपर्यंत लांबविण्याचा इरादा होता. मात्र आमच्या हल्लाबोलमुळे कर्जमाफीचे पैसे वर्ग केले आहेत, करीत आहोत, असे सरकारला जाहीर करणे भाग पडले. मुख्यमंत्री फडणवीस शिवसेना व नारायण राणे यांच्याबरोबर ‘डबल गेम’ खेळत आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील सत्ता स्थापनेवेळी, भाजपला गरज पडल्यास पाठिंबा देऊ अशी भूमिका घेतली होती. त्याचे समर्थन करताना आमदार पाटील म्हणाले की, राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे गेल्या साडेतीन वर्षात भाजप-सेनेमध्ये विश्वासाचे वातावरण दिसलेले नाही. जर लाट नसेल, तर भाजप साम, दाम, दंड, भेदाचा वापर करून काठावर का होईना, कशी निवडणूक जिंकतो, हे संपूर्ण भारताने गुजरातच्या निवडणुकीत पाहिले.

महाराष्ट्रात राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र आले व त्यांनी समविचारी पक्षांना बरोबर घेतले, तर राज्यात भाजपचे सरकार पायउतार होऊ शकते. सरकारच्या विरोधात जनतेत असंतोष वाढत आहे. तो २0१९ पर्यंत टोकाला जाऊ शकतो. यामुळे आगामी काळात महराष्ट्रात सत्ताबदल होणार हे निश्चित आहे.

आ. पाटील म्हणाले, विदर्भात कापसावरील बोंडअळी आणि धान्यावरील तुडतुड्या रोगाबाबत बियाणे कंपन्या, विमा कंपनी व केंद्र सरकारच्या मदत योजनेतून का होईना, भरपाई देऊ, अशी घोषणा सरकारला करावी लागली. अर्थात यामधून शेतकºयांच्या पदरात काही पडेल असे वाटत नाही.खा. राजू शेट्टींशी आघाडी?खा. राजू शेट्टी यांच्याशी आघाडी करणार का?, असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. त्यावर आ. पाटील म्हणाले की, तशी भेट अथवा चर्चा झालेली नाही. भाजपने निवडणुकीत देशातील शेतकºयांना दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. त्यांनी फसवणूक केली आहे, अशी शेट्टी यांची भावना झाल्याने ते सध्या भाजप सरकारच्या विरोधी काम करीत आहेत, एवढे माहीत आहे.