शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

सेना, राणेंशी मुख्यमंत्र्यांचा डबल गेम : जयंत पाटील-शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरी राष्ट्रवादी भाजपला पाठिंबा देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 00:33 IST

इस्लामपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकीकडे नारायण राणे यांना मंत्रिमंडळात घेणार म्हणतात, तर दुसरीकडे शिवसेनेला चुचकारताना त्यांना घेणार नाही

ठळक मुद्देराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील सत्ता स्थापनेवेळीसाडेतीन वर्षात भाजप-सेनेमध्ये विश्वासाचे वातावरण

इस्लामपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकीकडे नारायण राणे यांना मंत्रिमंडळात घेणार म्हणतात, तर दुसरीकडे शिवसेनेला चुचकारताना त्यांना घेणार नाही म्हणून सांगतात. या डबल गेममुळे सरकारची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. राणेंचा मंत्रिमंडळ प्रवेश शिवसेनेने मान्य केला, तर त्यांचे घोंगडे कोठेतरी अडकले आहे, हे सिध्द होईल.

तथापि राणेंच्या प्रवेशाने शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढला, तर राष्ट्रवादी भाजपला पाठिंबा देणार नाही, अशी माहिती राष्ट्रवादीचे गटनेते, आमदार जयंत पाटील यांनी बुधवारी दिली.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशन संपवून आल्यानंतर आमदार पाटील यांनी येथे पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, हल्लाबोल यात्रेमुळे सरकारवर दबाव निर्माण करून शेतकºयांची कर्जमाफी, वाया गेलेल्या शेतीमालाला नुकसानभरपाई असे निर्णय सरकारला घ्यायला भाग पाडले. शेतकरी आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शेतकºयांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरल्यामुळे सरकारला त्याची नोंद घ्यावी लागली. अधिवेशनात अनेकविध प्रश्नांवर सरकारला धारेवर धरले. उत्तर देण्याऐवजी मंत्र्यांनी चलाखीने या प्रश्नांना बगल दिली.

ते म्हणाले की, शेतकºयांच्या कर्जमाफीचे पैसे ३१ मार्चपर्यंत लांबविण्याचा इरादा होता. मात्र आमच्या हल्लाबोलमुळे कर्जमाफीचे पैसे वर्ग केले आहेत, करीत आहोत, असे सरकारला जाहीर करणे भाग पडले. मुख्यमंत्री फडणवीस शिवसेना व नारायण राणे यांच्याबरोबर ‘डबल गेम’ खेळत आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील सत्ता स्थापनेवेळी, भाजपला गरज पडल्यास पाठिंबा देऊ अशी भूमिका घेतली होती. त्याचे समर्थन करताना आमदार पाटील म्हणाले की, राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे गेल्या साडेतीन वर्षात भाजप-सेनेमध्ये विश्वासाचे वातावरण दिसलेले नाही. जर लाट नसेल, तर भाजप साम, दाम, दंड, भेदाचा वापर करून काठावर का होईना, कशी निवडणूक जिंकतो, हे संपूर्ण भारताने गुजरातच्या निवडणुकीत पाहिले.

महाराष्ट्रात राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र आले व त्यांनी समविचारी पक्षांना बरोबर घेतले, तर राज्यात भाजपचे सरकार पायउतार होऊ शकते. सरकारच्या विरोधात जनतेत असंतोष वाढत आहे. तो २0१९ पर्यंत टोकाला जाऊ शकतो. यामुळे आगामी काळात महराष्ट्रात सत्ताबदल होणार हे निश्चित आहे.

आ. पाटील म्हणाले, विदर्भात कापसावरील बोंडअळी आणि धान्यावरील तुडतुड्या रोगाबाबत बियाणे कंपन्या, विमा कंपनी व केंद्र सरकारच्या मदत योजनेतून का होईना, भरपाई देऊ, अशी घोषणा सरकारला करावी लागली. अर्थात यामधून शेतकºयांच्या पदरात काही पडेल असे वाटत नाही.खा. राजू शेट्टींशी आघाडी?खा. राजू शेट्टी यांच्याशी आघाडी करणार का?, असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. त्यावर आ. पाटील म्हणाले की, तशी भेट अथवा चर्चा झालेली नाही. भाजपने निवडणुकीत देशातील शेतकºयांना दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. त्यांनी फसवणूक केली आहे, अशी शेट्टी यांची भावना झाल्याने ते सध्या भाजप सरकारच्या विरोधी काम करीत आहेत, एवढे माहीत आहे.